राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा…..

सध्या निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीत आहेत. आपापल्या परीने ते मोर्चेबाधनी ते करीत आहेत. राज्यात मागील काही  दिवसांपासून सुरू असलेल्या गोळीबार,  हल्ला प्रकरणावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना आता शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. हे राज्य सरकार तात्काळ बरखास्त करावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

दोन दिवसांपूर्वी दहिसरमध्ये कथित समाजसेवक असलेल्या मॉरिसभाईने शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. ही हत्या फेसबुक लाईव्ह करून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याशिवाय, काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. त्यानंतर विरोधकांकडून आता राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावर सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.