‘हातकणंगलेच्या खासदारांनी आतापर्यंत काय केले? प्रकाश आवाडेंची टीका

शिरदवाड (ता.शिरोळ) येथील रस्ते कामाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रकाश आवाडे यांनी काही खासदारांवर टीका केली आहे. त्यांचे नाव न घेता आरोप केला.अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर होते.पंतप्रधान मोदी कर्तृत्वानच आहेत. जगात भारी अशी त्यांची चर्चा आहे. पण इथे खासदार कोण आहे? तो आपल्याला काय देणार? आतापर्यंत त्याने काय दिले, याची उत्तरे लोक मागणार आहेत.भाजपच्या जनसंपर्क अभियानातून घरोघरी चाललेल्या कार्यकर्त्यांना विचारा. लोक हळूच या खासदाराला बदला म्हणून सांगत आहेत, अशी गंभीर टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे नाव न घेता केली.

भाजपमध्ये आम्हाला चार हात लांब ठेवून राजकारण सुरू आहे. ते कोण करतयं, हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचाही नाव न घेता चिमटा काढला.

आमदार आवाडे हे महायुतीचे खासदार आणि संभाव्य उमेदवार धैर्यशील माने यांच्यावर टीका करून आपले पुत्र राहुल यांच्यासाठी फिल्डिंग लावत असल्याचीही चर्चा सुरु आहे.