स्वस्त धान्य दुकानदारही बऱ्याचदा या कुटुंबासाठी आलेल्या धान्याची परस्पर काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार अधून मधून समोर येत असतात. यासह काही शिधापत्रिका धारक मुळ पत्यावर राहत नसल्याने त्यांना ध्यान्य मिळत नाही.
यामुळे गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आली. बारा अंकी क्रमांकासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि हाताचे ठसे द्यावे लागतात. मात्र यातही आता बदल करण्यात आले आहेत.-पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड धारकांना या अगोदर हस्तलिखित रेशन कार्ड देण्यात येत होते. शासन निर्णयानुसार आता प्रत्येक रेशन कार्डधारकांना ई – रेशनकार्ड भेटणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना आता मोबाईल मध्ये रेशन कार्ड ठेवता येईल. रेशनकार्ड धारकांना ई-रेशन कार्ड वाटप करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत चालू होणार असल्याचे कळते.
रेशन कार्डधारकांनी संबंधित वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने माहिती भरल्यानंतर ती माहिती संबंधित पुरवठा निरीक्षकाकडे मिळणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रेशन कार्ड धारकांना ई – रेशन कार्ड भेटणार आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाचा सर्वत्र स्वागत होत आहे.