कबनूरमधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण……

इचलकरंजी शहराला पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. अशामध्ये अनेक पाईपलाईन गळतीमुळे देखील नागरिकांचे पाण्याअभावी खूपच हाल होत असतात. कबनूर येथील प्रभाग क्र.6 मधील इचलकरंजी- कबनूर रोडवरील सुतारमळा येथील कुपनलिका या बंद अवस्थेत आहेत.

त्यामुळे नागरिकांची पाण्यावाचून परवड होत असून ही कुपनलिका त्यांना आधार होती. पण ती बंद अवस्थेत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालून ही कुपनलिका लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. उन्हाळा असल्याने पाणीटंचाई तीव्र होणार आहे. त्यामुळे तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.