जरांगे पाटलांचा सरकारला अखेरचा इशारा…..

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंनी सरकारला घाम फोडला होता. आताही जरांगे पाटील राज्यभर दौरा करुन मराठा कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना जरांगे पाटलांनी सरकारला अखेरचा इशारा दिला आहे. तसेच जरांगे पाटलांनी निवडणूक लढवणार की नाही यावरही भाष्य केले आहे.

ते नेमके काय म्हणालेत ते जाणून घेऊयात… छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना जरांगे पाटलांना वंचित आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना जरांगे पाटलांनी सांगितले की, ‘प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाचा मी सन्मान करतो, ते नेहमी जे बोलतात, ते स्पष्ट बोलतात.

मात्र, राजकारण माझा मार्ग नाही. सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे, हाच माझा मार्ग आहे.’ मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशाला देताना म्हटले की, ’24 तारखेला आम्ही राज्यातील मराठा समाजाची बैठक बोलावली. या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे.

24 तारखेची अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल, त्यानंतर सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन. ही प्रचंड मोठी बैठक आणि निर्णायक बैठक असणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर निर्णय घेणार होते, मात्र आम्हाला घेता आला नाही.’