महावितरणकडून वीजबिलाच्या वसुलीचा तगादा……

दिघंची येथील वीज वितरण अधिकाऱ्यांकडून मार्च महिन्यात मुदतीअगोदरच वीजबिलाच्या वसुलीसाठी तगादा लावला जात आहे, यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. सध्या घरगुती वीजबिलाची मुदत ३० मार्चपर्यंत असूनही मुदतीच्या अगोदरच वीजबिलाच्या वसुलीसाठी वीज वितरणचे कर्मचारी दारोदारी येऊन तगादा लावत आहे.

इतर वेळेला कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असते. एरवी दुर्लक्ष करणारे कर्मचारी ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी मात्र तगादा लावत आहेत. सध्या मार्च एंड सुरू आहे, त्यामुळे एकीकडे बँका, पतसंस्था यांच्या कर्जवसुलीचा तगादा सुरू आहे. त्यातच ३० तारखेपर्यंत मुदत असूनही महावितरणचे कर्मचारी तगादा लावत आहेत त्यामुळे नागरिक त्रासले आहेत.