राजू शेट्टी यांचा जयंत पाटलांवर आरोप!

सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत जाणार नाही. जर भाजपचा खरोखरच पराभव व्हावा असे महाविकास आघाडीला वाटत असेल तर त्यांनी हातकणंगले मतदार संघात मला पाठिंबा द्यावा शिवसेना पक्ष पाठिंब्यावर सकारात्मक आहे.

मात्र अजूनही राष्ट्रवादी पक्षात काही भाजपप्रेमी लोक आहेत तेच माझ्या पाठिंब्यामध्ये अडथळे आणत आहेत असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता केलेला आहे.