इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद…..

हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दमच भरला. त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडी उमेदवारांसाठी सर्वांनी घासून-पुसून काम करायच आहे.

कोणाच्या घरी, कोणी चहा पिऊन गेलेले, मला चालणार नाही. कोणीही आले, घरात बसले, आम्ही काय करू, असला धंदा बंद करा. अचानक कोणी घरी आले तर तुम्ही घरी जाऊ नका, बाहेर जावा.

सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे तुमचे वैयक्तीक संबंध असतील ते इलेक्शननंतर. आपणास आधी महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणायचे आहे.लोकसभेची ही निवडणूक म्हणजे विधानसभेच्या आधीची रंगीत तालीम आहे, असे जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

त्यासाठी तुम्ही बुथचे नियोजन करा. आपणास मतदारसंघात शेवटच्या मतदारांपर्यंत जावे लागणार आहे. यामुळे बुथवरील मतदानाचा अभ्यास करा. या ठिकाणी आपला उमेदवार शिवसेना उबाठाचा आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी काम करायचे आहे.