कसबा बावड्यातील शांतता बिघडवणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा; सतेज पाटील

कसबा बावड्यातील सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, बावडा परिसराला ऐतिहासिक वारसा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ही जन्मभूमी आहे. बावड्यातील सर्व जाती धर्मातील लोक सुखाने गुण्यागोविंदाने रहात आहेत. मात्र, काही लोक येथे जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. पोलिसांनी तातडीने तपास करून संशयितांना अटक करावी.तसेच बावड्यातील सर्व कार्यकर्त्यांनी जातीय सलोखा टिकविण्यासाठी व शांतता अबाधित राखण्यासाठी दक्ष राहावे‌.