उन्हाळा ऋतू म्हटले की आठवतो तो परीक्षांचा काळ आणि त्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यातील सुट्ट्या. नुकताच दहावी- बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. वर्षभर अभ्यास केल्यानंतर मुलांना वेध लागतात ते उन्हाळी सुट्ट्यांचे. मात्र, उन्हाळ्यात फिरायला जायचे कुठे, असा प्रश्न नेहमीच मुलांच्या पालकांना भेडसावत असतो. कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे आराम मिळण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणीच जाण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो.
गरिबांचे काश्मीर म्हणून ओळख असणारे थंड हवेचे महाबळेश्वर व माथेरान या दोन ठिकाणी देखील तुम्ही जाऊ शकता. हे ठिकाण सर्वसामान्यांच्या बजेटमध्येदेखील आहे. त्याचप्रमाणे कोकणातील मालवण येथेदेखील समुद्रकिनारी फिरण्यासाठी मज्जा येते. तर उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा विचार करताय तर थंड हवेची ठिकाणे जाणून घेऊयात…….

१. कुलू मनाली
हिमाचल प्रदेशमधील थंड हवेचे व अत्यंत सुंदर आणि पर्यटनासाठी आदर्श असे ठिकाण म्हणून कुलू मनाली ओळखले जाते. येथे निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव घेत असताना त्यासोबत राफ्टिंग, बंजी जम्पिंगसारख्या साहसी खेळांसाठीदेखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे. त्याशिवाय तेथील स्थानिकांनी बनवलेल्या आकर्षक वस्तू खरेदी करता येतात.
२. नैनिताल
भारतातील ‘लेक डिस्ट्रिक्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेले उत्तराखंडमधील हे हिल स्टेशन भारतातील उन्हाळ्याच्या सुट्टीतील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले, नैनितालमध्ये नैसर्गिक चमत्कार तसेच महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्रे आहेत. तुम्ही प्रसिद्ध तलावावर बोटिंग करू शकता, खरेदीचा आनंद घेऊ शकता.
३. मसुरी
‘हिल स्टेशन्सची राणी’ म्हणून ओळखले जाणारे, मसुरी हे शहराच्या जीवनातील उष्णतेपासून आणि त्रासापासून दूर राहण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून ७,००० फूट उंचीवर उभे असलेले हे शांत ठिकाण निसर्गरम्य दृश्यांच्या बाहेर आणि हिरव्यागार टेकड्यांमधून संस्कृती आणि कलेच्या दृष्टीने खूप काही देते. हे लोकप्रिय लेखक रस्किन बाँड यांचे प्रसिद्ध गाव आहे.

४. उटी
दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक, उटी किंवा उधगमंडलमने अनेक लेखकांना आपल्या सौंदर्याने प्रेरित केले आहे. तलावांपासून ते संग्रहालये आणि उद्यानांपर्यंत कायम प्रसिद्ध असलेल्या निलगिरी माउंटन रेल्वेपर्यंत, उटीमध्ये कुटुंबातील प्रत्येकासाठी काहीतरी आहे.
५. आंबोली घाट
आंबोली घाट हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. २,२६० फूट उंचीवर स्थित आंबोली घाट हे थंड हवेचे ठिकाण असून निसर्गप्रेमी कोकणात फिरायला येताना या ठिकाणी आवर्जून भेट देतात. त्याचसोबत येथे पावसाळ्यातसुद्धा धबधबे आणि धुक्यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी भेट देतात.
६. काशीद
महाराष्ट्राच्या उत्तर कोकण समुद्रकिनाऱ्यावरील काशीद गाव वसलेले आहे. काशीद हे उन्हाळ्यात महाराष्ट्रात भेट देण्याच्या सर्वात छान ठिकाणांपैकी एक आहे. पांढऱ्या वाळूचे किनारे, स्पष्ट निळे समुद्र आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध असलेले काशीद हे एक योग्य ठिकाण आहे.

७. लोणावळा
लोणावळा महाराष्ट्रातील सर्वोत्तम पिकनिक स्पॉट म्हणूनच नव्हे; तर मुंबईच्या जवळील सर्वात चांगले पिकनिक स्पॉटपैकी एक आहे. आपल्या धबधब्यांमुळे लोणावळा ओळखला जातो. महाराष्ट्रातील उन्हाळ्यात सर्वांत जास्त भेट देणारे हे थंड हवेचे ठिकाण आहे.
८. महाबळेश्वर
सह्याद्री पर्वतात वसलेले महाबळेश्वर हे उन्हाळ्यात फिरायला जाण्याचे हमखास ठिकाण म्हणून ओळखले जाते. हे प्रेमीयुगुलांसाठी एक रोमँटिक गेटवे तर आहेच; परंतु उन्हाळी सुट्टी आनंदात घालवण्यासाठीचे सर्वोत्तम ठिकाणदेखील आहे. महाबळेश्वर हे ठिकाण मुंबईची ग्रीष्मकालीन राजधानी म्हणूनदेखील ओळखले जाते. त्यामुळे येथे उन्हाळ्यात पर्यटकांचा विशेष ओढा असतो.
