इचलकरंजीत जनसंपर्क वाढविण्यावर धैर्यशील मानेंचा भर!

लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केलेली आहे. लोकसभा निवडणुकीचा रंग जसा चढू लागला आहे. तशाच पध्दतीने निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनीही जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्याचे सुरु केले आहे. महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी शहरात वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला होता.

त्याचबरोबर सार्वजनिक मंडळे, संघटना, समाजबांधव महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेऊन आपल्या उमेदवारीचे समर्थन करत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन ते करत होते. खास. धैर्यशील माने यांनी वखारभाग, गुजराथी समाज, लिंगायत समाज, शहापूर म्हसोबा यात्रा, सांगली वेस परिसरात हनुमान मंदिर, आर. के.नगर, सांगली नाका व शांतीनगर कंजारभाट समाजबांधवांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.