राजू शेट्टी यांचे भावनिक आवाहन…..

गावात प्रत्येकाच्या शेतात म्हसोबा असतो. तो शेताची राखण करतो, त्यामुळे तुम्ही वर्षाला परडी सोडता. तुमच्या शेतातला म्हसोबा मीच आहे असे विधान राजू शेट्टी यांनी केले आहे.म्हसोबा तुमच्या ऊसाची राखण करतो, मी सुद्धा तुमच्या ऊसाची राखण करतो, त्यामुळे मला मत द्या असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. मला निवडणूक लढण्यासाठी जनता पैसे देते, ज्या दिवशी जनता मला पैसे देणार नाही, त्यादिवशी मी निवडणूक लढवणार नाही असेही शेट्टी म्हणाले.