जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात नव्याने रणधुमाळी…

राज्यातील राजकीय समीकरणे एकनाथ शिंदे बदलताच हातकणंगले लोकसभा मतदार देवेंद्र फडणवीस संघाच्या
निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळे पक्ष इस्लामपुरच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षांनी शिरकाव केला आहे.
इस्लामपूर – शिराळा मतदारसंघावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ अजित पवार ,बच्चू कडू वर्चस्व आहे. या दोन मतदारसंघात काँग्रेस, भाजप, शिवसेना-मनसे आणि इतर घटकपक्ष कार्यरत आहेत. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन नव्या पक्षांची भर पडली. इस्लामपूर- र- शिराळ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्याने एकूण चार गट कार्यरत झाले आहेत. भरीत भर म्हणून बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची नव्याने एन्ट्री झाली आहे.

त्यामुळे हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मैदानात भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जयंत पाटील यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना आणि मुळ शेतकरी संघटना आदी विविध पक्ष आणि संघटनांची रेलचे आहे.उद्धवसेना वगळता सर्वच पक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात कार्यरत आहेत. त्यामुळे आगामी काळात या सर्व विरोधकांचे आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे.

लोकसभा शिवसेना-राष्ट्रवादीतील फुटीने दोनाचे चार इस्लामपूर – शिराळ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्याने एकूण चार गट कार्यरत झाले आहेत. यामुळे राजकीय गोंधळात भरच पडली आहे. निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत. अनेक नव्या पक्ष, संघटनांचा या दोन्ही मतदारसंघात शिरकाव झाल्यामुळे दोन्ही मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.जयंत पाटील यांच्या विरोधातील नेत्यांची संख्या वाढत असल्यामुळे इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघातील त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.