उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा…

बारामतीची निवडणूक झाल्यानंतर वातावरण बदलल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे पवार, उद्धव ठाकरे यांचा पक्ष चार जूननंतर काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.नरेंद्र मोंदीशिवाय देशाला पर्याय नाही. इंडिया आघाडीकडे नेता, निती, नियत नाही.

काँग्रेस डुबती नाव आहे. देशासाठी काही करायचे असेल तर पंतप्रधानांच्या आवाहनानुसार पवार, ठाकरेंनी खऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत यावे, असे आवाहनही त्यांनी केले.शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची भोसरीतील गावाजत्रा मैदानावर शुक्रवारी ( १० मे) ‘विजयी संकल्प’ सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार विलास लांडे, मंगलदास बांदल, विकास डोळस यावेळी उपस्थित होते.