12 वी नंतर पोलीस भरती व्हायचे आहे तर मग तुमच्यासाठी निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती…

मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती साठी उमेदवारांची निवड कशी केली जाते, याची माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र पोलीस भरती साठी पात्र उमेदवारांची निवड कशी होणार? कोणते निकष आहेत? अभ्यासक्रम काय आहे? ऑनलाईन स्वरूपात भरती साठी अर्ज कसा सादर करायचा आहे? याची पण सविस्तर अशी माहिती आपण पाहणार आहोत. 

जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात किंवा भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात. तर तुमच्यासाठी या लेखात दिलेली मोठी माहिती फायद्याची ठरणार आहे.  मुख्य स्वरूपात आपण पोलीस भरती साठी उमेदवारांची निवड नक्की कशी होते, कोणते टप्पे असतात. कोणत्या निकषांवर उमेदवार पात्र होतो, आणि त्याला कोणत्या कारणाने रिक्त जागांसाठी भरती केले जाते. लेखी परीक्षा असते की ऑनलाईन परीक्षा, मुलाखत द्यावी लागते का? Passing Mark किती असतात? ही पण माहिती तुम्हाला या एकाच लेखामध्ये वाचायला मिळणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक माहिती वाचा, म्हणजे भरती निघाल्यावर तुम्हाला या माहितीचा फायदा होईल.

महाराष्ट्र पोलीस भरती साठी एकूण 4 टप्पे असतात, या चारी टप्प्यामध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना पोलीस पदासाठी निवडले जाते. यामधे सर्व टप्पे पार करताना उमेदवारांना मार्क Allot होतात, म्हणजेच मिळतात. त्यांनतर शेवटी सर्व टप्पे मिळून जेवढे मार्क पडले आहेत, त्यांची एकत्रित मार्क पाहून उमेदवार Short List केले जातात.  Short List केलेल्या उमेदवारांना Maharashtra Police Bharti Joining Latter मिळते. आणि त्यांना रिक्त जागांसाठी योग्य पदावर नियुक्त केले जाते.

महाराष्ट्र पोलिस भरती निवड प्रक्रिया टप्पे पुढीलप्रमाणे:

  1. लेखी परीक्षा
  2. शारिरीक चाचणी
  3. मेडीकल तपासणी
  4. कागदपत्रे पडताळणी

असे एकूण 4 टप्पे आहेत, जे उमेदवार पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना शारीरिक चाचणी साठी बोलवले जाईल. त्यांनतर उमेदवारांच्या Performens नुसार त्यांना गुण दिले जातील, जे उमेदवार शारीरिक चाचणी मध्ये पण पास होतील त्यांना मेडीकल तपासणी साठी बोलावले जाईल, जर उमेदवार मेडीकल तपासणी मध्ये फिट आला तर त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाईल. अशा रीतीने महाराष्ट्र पोलिस भरती निवड प्रक्रिया पार पडेल.

लेखी परीक्षा

महाराष्ट्र पोलीस भरती साठी सर्वात आधी जेव्हा शासनाद्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल, तेव्हा ठरवलेल्या कालावधी मध्ये पोलीस भरती लेखी परीक्षा पार पडेल. लेखी परीक्षा ही परीक्षा केंद्रावर जाऊन द्यावी लागते, त्यासाठी हॉल तिकीट देखील दिले जातात. हॉल तिकीट नुसार उमेदवारांना योग्य परीक्षा केंद्रात जाऊन लेखी परीक्षा द्यावी लागते. लेखी परीक्षे साठीचा अभ्यासक्रम आपण पुढे पाहणार आहोत, सोबतच लेखी परीक्षेत किती मार्क पडले तर उमेदवार पास होईल हे पण आपण जाणून घेणार आहोत.

लेखी परीक्षा अभ्यासक्रम

पोलिस भरती साठी एकूण 4 विषय असणार आहेत, प्रत्येक विषयाला 25 मार्क असणार आहेत, जो एकत्र मिळून 100 मार्काचा पेपर असणार आहे.

लेखी परीक्षेसाठी पेपर लिहिण्याचा कालावधी हा 1.5 घंटा असणार आहे, म्हणजे एकूण 90 मिनिटे पेपर लिहिता येणार आहे.

गणित25 प्रश्न25 मार्क
बौद्धिक चाचणी25 प्रश्न25 मार्क
मराठी व्याकरण25 प्रश्न25 मार्क
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी25 प्रश्न25 मार्क

लेखी परीक्षेत पास कसे व्हावे?

जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य पोलीस भरती लेखी परीक्षा मध्ये पास व्हायचे असेल तर तुम्हाला पोलीस भरती साठीचे सर्व Reference Book वाचावे लागतील, त्यांचा चांगला अभ्यास करावा लागेल. मोठी विशेष बाब म्हणजे मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा मध्यामिक शालांत स्तरावर असणार आहे. इयत्ता 10 वी मध बरेचशे मराठी व्याकरण चे प्रश्न विचारले जाणार आहेत. लेखी परीक्षा ही मराठी मधून होणार आसल्याने जर कोणाला इंग्रजी जमत नसेल, तरी देखील पोलीस भरती साठी तो उमेदवार अर्ज करू शकणार आहे. परीक्षा इतर पेपर प्रमाणे Negative Marking System मध्ये असणार नाही. त्यामुळे तुमचा कोणता प्रश्न जारी चुकला तरी तुमचे Mark Cut होणार नाहीत.

शारिरीक चाचणी

लेखी परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना नंतर शारीरिक चाचणी साठी बोलवले जाईल, Physical Test घेतली जाईल. यामधे उमेदवारास वेगवेगळ्या शारिरीक कसरती कराव्या लागतील. शारिरीक चाचणी मध्ये पुरुष आणि महिलांना चाचणी ही वेगवेगळी असणार आहे. यामधे केवळ एक बदल आहे, तो म्हणजे पुरुषांना 1600 मीटर रनिंग आहे तर महिलांना केवळ 800 मीटर रानिंग असणार आहे. महिलांना आणि पुरुषांना शारिरीक चाचणी चे गुण सारखेच असणार आहेत. एकूण 50 मार्क असतील, त्यापैकी 50% म्हणजे किमान 25 मार्क मिळवणे आवश्यक आहे.

पुरुषांसाठी शारिरीक चाचणी निकष

1600 मीटर धावणे20 गुण
100 मीटर धावणे15 गुण
गोळाफेक15 गुण

महिलांसाठी शारिरीक चाचणी निकष

800 मीटर धावणे20 गुण
100 मीटर धावणे15 गुण
गोळाफेक15 गुण

मेडीकल तपासणी

जे उमेदवार शारिरीक चाचणी मध्ये किमान 50% गुण प्राप्त करू शकले आहेत, त्यांची पुढच्या टप्प्यामध्ये मेडीकल तपासणी केली जाते.मेडीकल टेस्ट मध्ये उमेदवारांची शारीरिक क्षमता आणि आरोग्य तपासले जाते, जो उमेदवार निरोगी आणि फिट आहे, त्या उमेदवाराला पास केले जाते.

कागदपत्रे पडताळणी

शेवटी ज्या उमेदवारांची मेडीकल तपासणी झाली आहे, आणि ते पास झाले आहेत अशा सर्वांचे कागदपत्रे पडताळणी केली जाते. कागदपत्रे योग्य असतील तर उमेदवार भरती साठी पात्र असणार आहे, अन्यथा उमेदवाराला दिलेल्या मुदतीच्या आत कागदपत्रे जमा करावे लागतील. जर दिलेल्या कालावधी मध्ये Document जमा केले नाही तर उमेदवार बाद केला जाऊ शकतो. कागदपत्रे हा महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया मधील शेवटचा टप्पा आहे, त्यांनतर कोणतीही परीक्षा वगैरे असणार नाही. मग थेट पात्र उमेदवारांना रिक्त जागांसाठी भरती केले जाते.