पाणीपट्टी ३६५ दिवसांची पण पाणी मात्र…….

सोलापूर महापालिकेच्यावतीने नागरिकांकडून वर्षभरातील ३६५ दिवसांची पाणीपट्टी आकारली जाते. नागरिकांना पाणीपुरवठा मात्र पाच दिवसाआड होतो. पावसाळा असो की उन्हाळा, उजनी शंभर टक्के भरले किंवा नाही भरले सोलापुरात रोज नाही तर किमान दिवसाआड देखील पाणी पुरवठा होत नाही.आमच्याकडून वर्षभराची पाणीपट्टी घेता आणि आम्हाला पाच दिवसाआड पाणी पुरवठा करता, असा सवाल आता सोलापुरातील नागरिक विचारू लागले आहेत