इचलकरंजीत विद्युत तारांच्या वारंवार ठिणग्या

अलीकडच्या दिवसात कधी पावसाच्या सरी तर कधी जोराचा वादळी वारा यामुळे खूपच नुकसान होत आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडे रोडवर उन्मळून पडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास होतोच त्याचबरोबर लाईट देखील बंद होतेच. नदीवेस नाका श्री स्वामी समर्थ मंदिर मार्गावरील विद्युत तारांचा झाडांना स्पर्श होत असल्याने वारंवार ठिणग्या पडण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार केली असता महावितरण महापालिकेकडे आणि महापालिका महावितरणकडे बोट दाखविताना दिसत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.