हातकणंगलेतील पराभव राजू शेट्टींच्या जिव्हारी….

काल लीक्स्भा निवडणुकीचा निकाल हाती आला. हातकणंगले मतदार संघातून धैर्यशील माने यांचा विजय झाला. हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. माझं काय चुकलं. प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का?असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. राजू शेट्टी शेतकऱ्यांवरही नाराज असल्याचं दिसत आहे. शेतकऱ्यांनो तुम्हीही…, असंही ते म्हणालेत.

हातकणंगलेमधील पराभवामुळे राजू शेट्टींना धक्का बसल्याचं दिसत आहे. त्यांना विजयाची अपेक्षा होती, पण मतदारांनी त्यांना नाकारलं आहे. हातकणंगलेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांचा विजय झाला आहे. मानेंना 13 हजार 426 मतं मिळाली. तर राजू शेट्टी यांना 1 लाख 79 हजार 850 मतं मिळाली. वंचितच्या उमेदवाराने मत विभाजनाचं काम केलं. वंचितच्या उमेदवाराला 32 हजार 696 मतं मिळाली.