महाविकास आघाडीची पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मविआचे विविध नेते उपस्थित होते.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा जागा लढवणार असल्याचं लोकसभा लढवणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी म्हटलं.
खानापूर – आटपाडी आणि मिरज या दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं ते म्हणाले. लोकसभेत शिवसेना पक्षाबरोबरच महाविकास आघाडीशी काँग्रेस राष्ट्रवादीने गद्दारी केली होती. त्याबाबाबत उद्धव ठाकरेंनी मोठ्या मनानं काँग्रेस राष्ट्रवादीला माफ देखील केलं. मात्र, भविष्यात जर त्या पद्धतीने प्रयत्न झाला तर याची किंमत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल, असा इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला. सांगली जिल्ह्यात खानापूर आटपाडी आणि मिरज मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उभे राहतील असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे.