वैभव दादांच्या जोरदार हालचाली!

तासगाव तालुक्यातील नरसेवाडी अर्थात नरसिंहपूर येथील सुमारे 17 ते 20 शेतकऱ्यांसोबत मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

तासगाव येथील स्व.आर. आर. आबा पाटील खरेदी विक्री संघातून मिळालेली बियाणे बोगस असल्यामुळे तासगाव तालुक्यासह खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. स्व.आर. आर. आबा पाटील खरेदी विक्री संघातून मिळालेली बियाणे पेरल्यानंतर पीक उगवून न आल्याने बियाणांचा घोटाळा समोर आला आहे.

या मोठ्या घोटाळ्यात तासगाव तालुक्यातील असंख्य शेतकरी बाधित असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव दादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वैभव दादा पाटील यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी हात दिला आहे.

तर विभागीय कृषी अधिकारी प्रकाश गायकवाड आणि जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्याशी फोनवर चर्चा करून सदर शेताची पाहणी त्वरित करावी व पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.