निरेच्या पाण्यातून तिसंगी सोनके तलाव भरून घ्यावा,माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांची मागणी…

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातील अतिरिक्त पाणी नदीला सोडण्याऐवजी पंढरपूर तालुक्यातील तिसंगी सोनके मध्यम प्रकल्प, चिंचोलीसह लाभक्षेत्रातील छोट्या-मोठ्या तलावांना सोडण्यात यावे. तसेच तिसंगी सोनके तलावाप्रमाणे चिंचोली तलावालाही नीरा उजवा योजनेचा टेल टँक म्हणून जाहीर
करावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चिंचोली तलाव टेल टँक म्हणून जाहीर करावा नीरा उजवा कालव्याच्या तळाला किंवा टेल ला असणारा चिंचोली तलाव हा टेल टँक म्हणून जाहीर करावा आणि दरवर्षी हा तलाव नियमितपणे नीरा उजवा कालव्याच्या पाण्यातून भरून द्यावा अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केली आहे.

चिंचोली तलावात नियमितपणे पाणी सोडल्यास या पाण्यातून चिंचोली, सांगोला आणि बामणी या गावातील हजारो शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे.तथा माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले यांच्याकडे केली.उन्हाळी आवर्तन २०२४ मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील काही फाट्यांना अपुरे पाणी मिळाले होते. यामुळे नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता.

तसेच गेल्या आवर्तनात तिसंगी सोनके, चिंचोलीसह लाभक्षेत्रातील अन्य छोटे-मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने या तलावाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांची आणि शेतीची तहानही भागली नव्हती. सध्या नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. त्यामुळे तिसंगी सोनके आणि चिंचोली हे मोठे तलाव तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील नीरा उजवा कालव्यावर असणारे छोटे तलाव आणि सांगोला शाखा कालव्याला पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी साळुंखे पाटील यांनी केली आहे.