राज्यात पूरस्थिती, कोल्हापुरातील पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी!

कोल्हापुरात सध्या पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीने गाठली धोक्याची पातळी ओलांडली आहे.पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली 43 फुटांवर तर राधानगरी धरण देखील 98 टक्के पेक्षा जास्त भरलं .राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज दुपारपर्यंत उघडण्याची शक्यता .अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी केले बंद .कोल्हापूर कडून रत्नागिरीला जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पावसाच्या दमदार सरी

 राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने राज्यातील पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे, सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरण देखील 98 टक्के पेक्षा जास्त भरले आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज दुपारपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.