आष्टा येथील पूरग्रस्तांना टँकरद्वारे पाणीपुरवठा प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली….

राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापुराच्या सावटाखालील गावांना आष्टा येथील
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या युवक कार्यकर्त्यांच्या कडून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू केले आहेत.राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, माजी संचालक माणिक शेळके, माजी नगरसेवक अर्जुन माने, दीपक मेथे, आष्टा शहर युवकचे माजी अध्यक्ष अनिल पाटील यांनी तुंग, कसबे डिग्रज, चांदोली वसाहत, कवठेपिरान, दूधगाव या गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चालू केला आहे.गावांना महापुराच्या आलेल्या पिण्याच्या टँकरच्या माध्यमातून मदतीचा हात दिल्याबद्दल ग्रामीण भागातील ग्रामस्थांकडून सर्वांचे कौतुक होत आहे.