इचलकरंजी येथील शहापूर स्मशानभूमीमध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यानंतर नातेवाईकांनी पुन्हा अंत्यसंस्कार केले. या घटनेने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील पंचगंगा नदी तीरावर असलेल्या स्मशानभूमीत पुरामुळे पाणी आले आहे. त्यामुळे इचलकरंजी शहर व परिसरातील मृतदेहांवर शहापूर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
त्याच्यावर शहापूर स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर नातेवाईक निघून गेले; परंतु सरणासाठी असणारी लाकडे कमी पडल्याने मृतदेह अर्धवट जळाला होता.
पहाटेच्या सुमारास काही नागरिक स्मशानभूमीत आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अर्धवट जळालेला मृतदेह भटक्या कुत्र्यांनी ओढत बाहेर काढल्याचे व त्याचे लचके तोडल्याचे निदर्शनास आले.