गणेशोत्सव काळात अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी!

गणेशोत्सव महाराष्ट्रभर अगदी उत्साहात साजरा केला जातो. उद्या गणेश आगमन होणार आहे. प्रत्येक गणेश मंडळांची तयारी अगदी पूर्ण देखील झालेली आहे. मंडप सजवण्यापासून आरती पर्यंतचे सर्व आयोजन मंडळातर्फे करण्यात येते. गणेशोत्सव काळात अनेक प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आलेले आहे. त्यासाठी नागरिकांची गर्दी देखील झालेली आहे.

त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी देखील निर्माण होत आहे. अशातच अवजड वाहने या गर्दीच्या ठिकाणी येत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने योग्य नियोजन करून गणेशोत्सव काळात मुख्य रस्त्यावरील अवजड वाहतूक बंदी करावी अशी मागणी सध्या नागरिकांमधून होऊ लागलेली आहे.