हातकणंगले लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक गाजलेल्या इचलकरंजी पाणी प्रश्नाला आता पुन्हा उकळी फुटू लागली आहे. इचलकरंजीच्या जनतेला मुबलक आणि स्वच्छ पाण्यासाठी मागच्या काही काळापासून आंदोलन सुरू आहे. यावर इचलकरंजीकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सुळकूड योजना अंमलबजावणीसाठी ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत येथे कोणत्याही मंत्र्यांना येऊ देणार नाही, असा निर्णय इचलकरंजी-सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची माहिती तांत्रिक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना इमेलद्वारे दिली आहे.