उद्धव ठाकरे यांची सांगली पॅटर्नवर प्रतिक्रिया…..

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. सांगली लोकसभा निकालावर देखील उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.आज विशाल पाटील, विश्वजीत कदम आणि चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट घेतली.लोकसभा निवडणूक सांगली लोकसभेमुळे चांगलीच गाजली. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्यानंतर ठाकरे गटाने सांगलीत आपला उमेदार दिला होता. त्यामुळे देशात खळबळ माजली होती.

पण विशाल पाटील यांनी आपली भूमिका सोडली नाही. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला होता. भाजपकडून संजय पाटील मैदानात होते, मात्र विशाल पाटील यांनी मैदान राखलं.उद्धव ठाकरे म्हणाले, विशाल पाटील, विश्वजित कदम, चंद्रहार पाटील ही तरुण मुलं. त्यावेळी घडायला नको होत ते झालं. पण तिथे भाजप जिंकला नाही याचा आनंद आहे. चंद्रहार पाटील पडले त्याचं दु:ख आहे पण तिथे भाजप जिंकला नाही याचा आनंद.