ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जाणार की…..

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध आता लागले आहेत. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहेत. दरम्यान सर्वच पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झालेली आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचा टिझर प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे , अनिल देशमुख, राजेश टोपे आणि सुनील भुसारा हे नेते उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना मोठा दावा केला आहे. महाराष्ट्र सरकार घाबरलं आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणारी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचं, ते म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे.