येत्या विधानसभा निवडणुकीत स्वराज पक्ष सर्व जागा लढवणार असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्याशी संबंध नसणार असल्याचा खुलासा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अजून झाली नसली तरी आम्ही ती करणार असल्याचे सांगत या विधानसभेला तिसरी आघाडी करण्याची शक्यता संभाजीराजे यांनी बोलून दाखवली. स्वराज्य पक्षाचे नेते महादेव तळेकर यांनी आज भोसे येथे आयोजित केलेल्या महामंडळ महाएक्स्पो सोहळ्याच्या उदघाटनाला आले असता संभाजीराजे बोलत होते. यावेळी राजरत्न आंबेडकर हे देखील उपस्थित होते. मनोज जरांगे यांचा दृष्टीकोण आणि माझ उद्दिष्ट एक असल्याचे सांगत मनोज जरांगे, संभाजी राजे छत्रपती विधानसभेला एकत्र येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
Related Posts
दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
पोस्ट ऑफिस अर्थात भारतीय डाक विभाग अंतर्गत मोठी बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. 9 डिसेंबर 2023 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आणखी एक मोठा निर्णय!
लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकांकडे लागले असून येत्या काही महिन्यातचया निवडणुका पार पडणार आहेत. याच निवडणुका डोळ्यांसमोर…
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत !
गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊन उलथापालथ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर…