सुहासभैय्या बाबर यांच्या पाठपुराव्याला यश! पाच कोटीचा एवढा भरीव निधी मंजूर

अनेक वर्षांपासून आटपाडी बसस्थानक सुसज्ज व्हावे अशी इच्छा नागरिकांची होती. याची दखल अनिल बाबर यांनी घेतली होती. परंतु त्यांचे निधन झाल्याने बस निधीला ब्रेक लागला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी आटपाडी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला. त्याची दखल घेत परिवहन विभागामार्फत आटपाडी बसस्थानकच्या पुनर्बांधणीसाठी झाला आहे. आमदार अनिल बाबर यांनी आटपाडी बसस्थानक सुसज्ज व प्रशस्त व्हावे यासाठी सुहास बाबर परिवहन विभागाकडे निधीची मागणी केली होती.

त्यावर परिवहन विभागाने आटपाडी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ५ कोटी रुपये एवढा भरीव निधी मंजूर केल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली. सुहास बाबर म्हणाले, मतदारसंघातील विटा, आटपाडी आणि खानापूर या तिन्ही महत्त्वाच्या शहरांतील बसस्थानके सुसज्ज व्हावीत, त्यांचे नूतनीकरण व्हावे यासाठी अनिल बाबर प्रयत्नशील होते.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर सुहास बाबर यांनी आटपाडी बसस्थानकासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला. त्याची दखल घेत परिवहन विभागाने आटपाडी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कोटी रुपये एवढा भरीव निधी मंजूर केला आहे. मंजूर झालेल्या निधीतून आटपाडी बसस्थानकात बारा फलाट, रेस्ट रूम. गेस्ट रूम, टॉयलेट ब्लॉक, स्टॅन्ड इन्चार्ज रूम, पासेस रूम तसेच अंतर्गत काँक्रिटीकरण अशी कामे करण्यात येणार आहेत.