लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी डॉ. नागनाथअण्णांच्या नावे स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अनिल पाटील यांच्यासोबत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व झालेल्या बैठकीत चर्चा झाली. राज्यातील धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नावे स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा आराखडा द्यावा.
येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावास मंजुरी देऊ, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले. खासदार धैर्यशील माने, गौरव नायकवडी यांच्या उपस्थितीत मुंबईत गुरुवारी बैठक झाली. यावेळी वित्त विभाग सहसचिव विवेक दहिफळे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसंपदा विभागाचे प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.