विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघात नवा ट्विस्ट……

महाविकास आघाडीत सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारसंघ वाटणीमध्ये काँग्रेस पलूस, कडेगाव, सांगली आणि जत तर राष्ट्रवादी शिराळा, वाळवा, तासगाव असे जागा वाटप होणार आहे. मात्र खानापूर आणि मिरजेबाबत महाविकास आघाडी पक्षांतर्गत वाद सुरू आहे. या दोन्ही मतदारसंघावर काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी दावा सांगितला होता.

खानापूर ची जागा कोणाकडे? याबद्दल शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असताना आता विटा काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि आटपाडीचे पक्ष निरीक्षक गजानन सुतार यांना पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल करून मुलाखत देण्यास सांगितल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे श्री गजानन सुतार यांची राहुल गांधी यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत.

भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना गजानन सुतार हे त्यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते. तसेच कदम आणि पाटील कुटुंबीयांबरोबर ही घनिष्ट संबंध आहे त्यामुळे त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. काँग्रेसने आजवर अनेक सामान्यांना तिकीट देऊन असे राजकीय धक्के अनेकदा दिले आहेत.