सुहासभैयांच्या पाठीशी भाजप ठाम उभी! सुहास बाबर याना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार…..

विटा येथे भारतीय जनता पार्टीची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यात महायुतीच्या सरकारने प्रचंड विकासकामे केली आहेत. ती सर्व विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा आणि या मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांना सर्वाधिक मतांनी विजयी करा भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. असे आवाहन बेळगाव दक्षिणचे आमदार व  सांगली जिल्ह्याचे प्रभारी अभय पाटील यांनी केले. विटा येथे भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत आमदार अभय पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, खानापूर विधानसभा मतदारसंघ प्रभारी सुनील हेगडे उपस्थित होते. या बैठकीत महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना मताधिक्य मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यानी सांगितले.
सदर बैठकीला अनिलआप्पा बाबर, ज्येष्ठ नेते बाबा बर्वे, किशोर डोंबे, सुहास पाटील, श्रीधर जाधव, कुमार लोटके, विलास काळेबाग, विक्रम भिंगारदेवे, करण जाधव, दत्तात्रय तारळेकर, पंकज नलवडे उपस्थित होते. यावेळी सुहास बाबर याना बहुमताने निवडून आणण्याचा सर्वांनी निर्धार केला.