न भूतो न भविष्यती अशी महायुतीच्या प्रचाराची सांगता

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान होत असून गेले तीन आठवडे धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. भव्य रॅली, पदयात्रा, जाहीर सभांच्या धडाक्यात प्रचाराचा समारोप झाला. छोट्या  पद्धतीने पदयात्रा करायचा असा माझा निर्णय होता. पण विट्यात पदयात्रा काढून दाखवा असे काल कुणीतरी आव्हान दिले. आणि न भूतो न भविष्यती अशी आपल्या प्रचाराची सांगता पदयात्रा झाली. राजकारणात कुणालाही कमी लेखायचे नसते. आपणाला काल दिलेल्या आव्हानाला जनतेने दिलेले हे उत्तर आहे. हि निवडणुक जनतेने हातात घेतल्याचे दिसुन येत आहे. उरलेले दोन दिवस माझ्यासाठी दया हा सुहास तुमच्यासाठी कायम समर्पित राहील असे भावनिक आवाहन महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी केले.

खानापूर आटपाडी विसापूर सुहास बाबर यांच्या प्रचाराची सांगता  विटा शहरातील पदयात्रेने करण्यात आली. या पदयात्रेला अपार उत्साह, प्रचंड प्रतिसादात मिळाला. यावेळी मोजक्या शब्दात सुहास बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले मी प्रचाराच्या निमीत्ताने महिनाभर मतदारांच्याकडे जात आहे. त्यांचा प्रतिसाद पाहता मला प्रचंड मोठया विजयाची खात्री आहे. आजची पदयात्रा अत्यंत शांततेत झाली त्याबद्दल मी तमाम विटेकरांचे आभार मानतो. आपण कुणालाही कमी लेखायचे नाही. हे दोन दिवस आपल्या सर्वांच्यासाठी महत्वाचे आहेत. अत्यंत जागरूकतेने आणि सजगतेने या निवडणुकीसाठी आपण सामोरे जावू या असे आवाहनही बाबर यांनी केले .

या पदयात्रेत सर्व जेष्ठ मंडळी, महायुतीतील सर्व घटक, महिला वर्ग, तरुण मंडळी, विटा नगर पालिकेचे सर्व आजी माजी पदधिकारी, आजी माजी नगरसेवक, विवीध संस्थांचे, संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरापासून सुरु झालेली ही पदयात्रा मन्मथ मंदिर, सोनार गल्ली, चांभार वेस, शितोळे गल्ली, गणपती मंदिर, उभी पेठ आडवी पेठ, जैन मंदिर, विठ्ठल मंदिर, मारुती मंदिर मुस्लिम मोहल्ला, नेहरूनगर, छ. शिवाजी महाराज चौक, स्थानक, सावरकर नगर, वजन काटा, चौंडेश्वरी मंदिर, खरेदी विक्री संघ, मस्जिद, फॉरेस्ट कार्यालय, शकुन फिड्स, मॉडर्न शाळा ते क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते पुन्हा छ. शिवाजी महाराज चौक येथे सांगता करण्यात आली. 

रस्त्याच्या दुतर्फा सुहास बाबर यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. पद्यात्रेतील मार्गावरील विविध धर्माच्या सर्व मंदिरात बाबर यांचे स्वागत करण्यात आले. रस्त्या रस्त्यावर रांगोळी घालुन सुहास बाबर यांचे लाडक्या बहीणी औक्षण करत होता. मुस्लिम बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तर मुख्य चौकात सुहास बाबर यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. सांगता झाल्यानंतर बाबर यांनी ही निवडणुक शांततापूर्ण व गांभीर्यपूर्वक पार पाडावी असे कार्यकर्त्यांना आवाहन केले.