नागपुर अधिवेशनात सभागृहामध्ये आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अनेक प्रश्न उपस्थित करुन वेधुन घेतले सरकारचे लक्ष….

 विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदार संघातुन निवडुन आलेले लोकप्रिय आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख हे निवडुन आलेबरोबर एका महिन्याच्या आतच नागपुर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पार पडले. गेले कित्येक वर्षे स्व गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांनी अकरा वेळा आमदार असताना कित्येक अधिवेशनात सहभाग नोंदवला व जनतेचे अनेक प्रश्न उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधुन ते प्रश्न सोडवण्यास सरकारला भाग पाडले होते त्याच कामकाजाची पद्धत नागपुर येथील पावसाळी अधिवेशनामध्ये नुतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या रुपाने पहावयास मिळाली.

पहिल्याच अधिवेशनामध्ये आपल्या मतदार संघातील व राज्यातील प्रश्न उपस्थीत करण्याची परवानगी मागितली व आध्यक्ष महोदयांनी वेगवेगळ्या विषयांवर 6 वेळा बोलण्याची संधी दिली व त्या संधीचा पुरेपुर फायदा आमदारसाहेबांनी घेत सांगोला मतदार संघातील व राज्यातील मांडलेले प्रश्न पाहता संपुर्ण महाराष्ट्राला पुन्हा आबासाहेबांच्या कामकाजाची पध्दती सभागृहामध्ये पहावयास मिळाली.

आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहामध्ये प्रथमच बोलताना महाराष्ट्राच्या आस्मितेचा प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक अरबी समुद्रात उभे करण्याच्या कामाला कधी सुरवात होणा ? असा प्रश्न उपस्थित केला. लोणारी ,होलार व रामोशी समाजासाठी अर्थीक विकास महामंडळाची स्थापना झाली असुन त्या महामंडळास अर्थीक मदत केंव्हा देणार ? स्व.आबासाहेबांच्या प्रयत्नानांने मंजुर झालेल ट्रॉमा सेंटर केंव्हा सुरु होणार? थकीत चारा छावण्यांची बिले छावणी चालकास त्वरीत देण्याची मागणी केली.

तसेच तेल्या रोगाने उध्वस्त झालेल्या बागांचे पुनर लागवड करण्यासाठी सरकारने अनुदान जाहीर करावे. तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती व्यवसाय अडचणीत आल्याने शेतकरी दुध व्यवसायाकडे वळाला आहे.अशावेळी गायीच्या दुधाला प्रतिलिटर 40/- रुपये दर देण्यात यावा व दुधाला जे अनुदान मिळत आहे ते प्राप्त होण्यासाठी ज्या जाचक अटी आहेत त्या अटी शिथील कराव्यात. तसेच वस्रोउद्योगाला चालना देण्यासाठी सुतगिरण्यांना लादलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात ..स्व आबासाहेबांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेले सांगोला शहरात ट्रॉमा सेंटर उभारले असुन त्याचे लोकार्पण ताबडतोब करावे.

आरोग्य विभागातील कर्मचारी संख्या ताबडतोब वाढवावी..अशा प्रश्नांना सभागृहात वाचा फोडली. माण, बेलवण,कोरडा,अपृफा या नदीपात्रातील बेकायदेशीर वाळु उत्खनन ताबडतोब बंद करावे व बांधकामासाठी लागणारी वाळु सरकारी नियमाप्रमाणे नागरीकांना मिळावी सांगोला मतदार संघामध्ये सरकारी बस वाहतुक अगदी कमी प्रमाणात असुन नागरीकांचे व विशेषता शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत तरी सरकारी बस सेवा योग्य त्या प्रमाणात ताबडतोब सुरु करावीईमारती साठी ताबडतोब निधी मिळावा ही मागणी केली. 

मेडशिंगी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तिन वेळा उद्घाटन होऊन सुध्दा कर्मचारी व डॉक्टरावीना ते आरोग्य केंद्र बंद आहे तशीच अवस्था खिलारवाडी ,बंडगरवाडी व हलदहिवडी येथील प्राथमीक आरोग्य केंद्राची आहे या ठिकाणी झाडे उगवली आहेत तरी ही प्राथमिक आरोग्य केंद्रे ताबडतोब सुरु करावीत.

 सांगोला नगरपरीषदेच्या नविन इमारतीच्या बा़ंधकामासाठी 10 कोटी निधी उपलब्ध करुन दिला आहेराज्यात सध्या जे हिंद केसरी पैलवान व महाराष्ट्र केसरी पैलवान यांना 6000 ते 13000 रुपये मानधन सरकारने जाहीर केले आहे ते मानधन एप्रिल महिन्यापासुन मिळालेले नाही आसे मानधन न मिळालेले 7 हिंद केसरी व 20 महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत तरी यांचे मानधन ताबडतोब मिळावे आसी मागणी अधिवेशनाच्या पाचव्या वेळेस बोलताना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली.