वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आम. अशोकराव माने यांनी स्वतः जागेवर जाऊन केली परिस्थितीची पाहणी,  दिल्या सक्त सूचना

अलीकडच्या काळात वतुकीची कोंडी हि प्रत्येक शहरात नित्याचीच झालेली आहे. या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील खूपच वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच वाहतुकीची स्थिती सांगली -कोल्हापूर मार्गावर हातकणंगले बस स्थानक चौकात गेली अनेक महिन्यांपासून कोंडी नित्याचीच बनली आहे. त्यात ऊस हंगाम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरमुळे नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

याची माहिती नूतन आमदार अशोकराव माने यांना लागताच त्यांनी थेट हातकणंगलेतील बस स्थानक चौकातील परिसर गाठत पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना तेथे बोलावून कान उघाडणी केली. सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आमदार अशोकराव माने यांनी स्वतः जागेवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाला तात्काळ यातून मार्ग काढत वाहतूक नियंत्रकासह मुख्य हायवे समोरील पंचायत समिती ऑफीस ते इचलकरंजी फाटा येथे नेहमी होणारा वाहतूक अडथळा दूर करण्याच्या सूचना दिल्या.

पुन्हा या मार्गावर वाहतूक कोंडी दिसल्यास एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही, असा दम आमदार अशोकराव माने यांनी दिला. मतदारसंघातील नागरिकांची गैरसोय झाल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही.हे सांगतानाच चुकीच्या नियोजनाने अपघातासारखे प्रसंग घडल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीदही दिली. नागरिकांची वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या गैरसोयीमुळे आमदार माने चांगलेच संतप्त झालेले दिसले. मुख्य हायवेवरील बसस्थानक चौकात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचे तात्काळ नियोजन करा, लोकांची गैरसोय होता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.