सांगली व खानापूर रोडवरील खड्डे त्वरित बुजवावेत अन्यथा मोठे जनआंदोलन उभारून ठिकठिकाणी रस्ता रोको करण्याचा इशारा……

अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसत आहेत. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यामुळे कित्येक जणांना जीव देखील गमवावा लागलेला आहे. सांगली आणि खानापूर रोडवरील रस्त्यांवर खड्डे असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागलेला आहे.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० वरील माहुली ते तासगाव पर्यंत व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ इ वरील रेवानगर विटा ते रेणावी या ठिकाणी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत, ठीक- ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरती सातत्याने अपघात होत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे वाहनधारकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत यापूर्वीही आम्ही मागणी केलेली होती सदर मागणीच्या अनुषंगाने माननीय कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांनी  रस्ते दुरुस्त करून घेत आहोत असे लेखी पत्राने कळवले होते तरीही अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली दिसून येत नाही.

वरील राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची दखल त्वरित घ्यावी अन्यथा मोठे जनआंदोलन उभारून ठिकठिकाणी रस्ता रोको करण्यात येईल अशा मागणीचे पत्र माननीय कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांना दिले असल्याचे श्री वैभव सदाशिवराव पाटील यांनी सांगितले.