खानापूर तालुक्यातील ऐनवाडी गाव अलीकडच्या काळात खूपच नावारूपास आलेले आहे. महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह नरिमन पॉइंट मुंबई येथे आनंददायी शिक्षणपद्धती या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले होते. या शिक्षण परिषदेमध्ये महाराष्ट्रातील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केलेल्या संस्थांची निवड करण्यात आली आहे.
ऐनवाडी येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ अगस्ती विद्यालयाने संचालित महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियानात खानापूर तालुक्यात तसेच सांगली जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. याची दखल घेत आनंददायी शिक्षण परिषदेसाठी या संस्थेची निवड झाली. मुंबईतील चर्चासत्रामध्ये या शिक्षण पद्धतीविषयी सांगोपांग चर्चा होणार आहे. यामध्ये संस्था सहभागी होईल.