अलीकडच्या काळामध्ये चोरीच्या प्रमाणात भरपूर वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा चोरीचे सत्र खानापूर तालुक्यांमध्ये देखील सुरूच आहे. चक्क खानापूर तालुक्यातील देवखिंडी येथे काल एकाच रात्रीच पाच बंद घरांची घरफोडी करण्यात आलेली आहे. यावेळी या बंद घरामध्ये कोणत्याही प्रकारचा ऐवज न सापडल्यामुळे चोरट्यांनी घरातील सामानांची तोडफोड करत नासधूस केली.
बंद घराची कुलपे फोडल्याने हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस पाटलांनी याबाबत पोलीस स्टेशनला कळवले होते. फोडलेल्या घराचे मालक व्यवसाय निमित्त बाहेर असल्याने चोरीचा प्रकार चोरीचा तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केलेली नाही. लेंगरेसह परिसरातील अनेक लोक हे गलाई व्यवसायनिमित्त देशभर विखुरलेले आहेत. गावाकडची त्यांची घरे कायम बंद स्वरूपात असतात.
यात्रानिमित्त हे लोक गावी येत असतात. मात्र चोरट्याने गलाई व्यावसायिकांच्या बंद घरावर घरफोडी सुरू केल्याने गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मागील काही वर्षांपूर्वी ही चोरट्यांनी एकाच दिवशी दहा ते बारा बंद घरांची घरफोडी करून तोडफोड केली होती. पुन्हा एकदा हे बंद घरफोडीचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांसमोर घरफोडी रोखण्याचे आवाहन उभे राहिलेले आहे