इचलकरंजी येथील पंचगंगा नदी पत्रातील गाळ काढण्यास आज सुरवात करण्यात आली. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तलाठी सुनील भातमारे हे उपस्थित होते . इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणात साठलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांमार्फत काढून घेऊन जाणेसाठी मान्यता देणेबाबतचा निर्णय कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या मागणीवरून या संदर्भातील बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली.
त्यानुसार शनिवारी गाळ काढण्यास सुरवात करण्यात आली. सदर निर्णयामुळे पंचगंगा नदी मोकळा श्वास घेणार तर आहेच शिवाय महापूर नियंत्रणासाठी या निर्णयामुळे मोठा हातभार लागणार असल्याचे मत आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब कलागते, राहुल घाट, शशिकांत नेजे, शिवाजी काळे, बाबू रुग्गे, दादा मगदूम, सागर तम्मे, राजू कोरे, तौफिक मुजावर, असिफ मुजावर, राजू चनमिरे, गुंडू नेजे, आर. के. पाटील, विनायक कोरे, तानाजी भोसले, राजू दरीबे, बजरंग कुंभार आदि उपस्थित होते.