अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई ला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी अनेक भागात नागरिकांना पायपीट देखील करावी लागते. वाळवा तालुक्याच्या पश्चिम भागातील ऐतवडे बुद्रुकसह कार्वे, इगेवाडी, जक्राईवाडी, शेखरवाडी, शिवपुरी, वाघवाडी ही गावे संपूर्णपणे विहीर बागायत आहेत. सध्या येथील ओयातील पाणी आटले असून फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. येथील पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी वाकुर्डे बुद्रुक योजनेतून बंदिस्त पाईप लाईनद्वारे पाणी कार्ये ढगेवाडी, जक्राईवाडी येथील तलावात सोडण्यात यावे.
शेखरवाडी, बापवाडी, शिवपुरी येथील ओक्यात ज्या ठिकाणी वितरण व्यवस्था आहे. त्या चेंबर मधून पाणी सोडावे अशी मागणी होत आहे. या योजनेचे पाणी या तलावामध्ये सोडणेबाबत शहाजी गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे कळवले आहे. याची दखल घेऊन वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे सोडण्यात यावे अन्यथा योजनेच्या कार्यालयास टाळेठोक आंदोलन करणार असत्त्वाचे गायकवाड यांनी सांगितले. ३० जानेवारी पर्यंत पाणी न सोडल्यास योजनेच्या कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करणार असल्याचा इशारा राजारामबापू बँकचे माजी संचालक शहाजी गायकवाड यांना दिला आहे.