सध्या अनेक भागांमध्ये विविध विकासकामे सुरु आहेत. रस्ते, पाणी, वाहतूक याबाबतीतील नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे सध्या प्रत्येक भागात प्रयत्न सुरु आहेत. आटपाडी शहरातील साईमंदिर चौक ते पोलिस स्टेशन रस्ताकामांचे काम सुरू झाले असून त्यामध्ये परिसरातील मंदिरांची तोडफोड केली जात आहे. समोरील अतिक्रमाला अभय देत संबंधित ठेकेदार, नगरपंचायत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत अभय देत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
सदर मंदिरांची सुशोभीत करावे अशी मागणी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलशेठ पाटील व स्थानिक नागरिकांनी केली. त्याबाबत परिसरात आंदोलन करण्यात आले व रस्ता काम बंद पाडण्यात आले आहे. जोपर्यंत मंदिराचे सुशोभीत केले जात नाही तोपर्यंत काम बंद राहणार असल्याचे आंदोलनकांनी सांगितले. शासनाने रस्ताकामांबाबत आराखडा तयार केला असून त्या पध्दतीत काम करावे परिसरातील मंदिरांचे याबाबत कोणताही धक्का पोहचू नये अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. मंदिराच्या परिसरात उपस्थित राहून या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.