आटपाडीतील लोकांकडून रस्त्याचे चालू काम अडवण्याचा प्रयत्न : दत्तात्रय पाटील 

आटपाडी शहरातील विकासकामांना निधी आणुन लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असताना काही मंडळींनी विघ्न आणत आहेत. सध्या आटपाडीतील साई मंदिर ते पोलीस स्टेशन चौक या २० कोटीच्या रस्त्याचे काम सुरू असुन हे काम अडविण्याचा उद्योग झाला आहे. लोकांची गैरसोय करून कामे बंद पाडणाऱ्यांनी आधी गावासाठी निधी आणावा असे दत्तात्रय पाटील पंच यांनी म्हटले आहे. आटपाडीतील काही लोक कामे अडविण्यासाठी पुढाकार घेत असुन नागरिकांची गैरसोय करण्यासाठी ही धडपड सुरू आहे. दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर, विद्यमान आमदार सुहास (भैय्या) बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील (अध्यक्ष) यांच्या माध्यमातुन आटपाडी नगरपंचायत क्षेत्राचा सर्वांगिण विकास मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

आटपाडीसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणुन त्या निधीतून आटपाडीला शहराचे वेगळे रूप निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आटपाडीची नगरपंचायत निर्माण करण्यासह विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आमच्या नेतृत्त्वाने आणण्यासाठी कष्ट घेतले. रस्ते, वीज, आरोग्यासह अनेक प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी विविध माध्यमातुन प्रयत्न केले. पुढे सेना अध्यक्ष मनोज नांगरे पाटील म्हणाले की, आटपाडीतील अनेक वर्षांचे प्रश्न स्व. अनिलभाऊ बाबर, आमदार सुहासभैय्या बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातुन सुटले आहेत. सध्या सुरू असणाऱ्या रस्त्याचा आव्हानात्मक प्रश्नही नेते सोडवत आहेत. मात्र काही मंडळी कामे आणुन प्रश्न सोडविण्याऐवजी लोकांच्या अडचणी वाढवत आहेत.