टेंभू योजनेचे मुख्य आवर्तन आटपाडी तालुक्यात सुरू झाले असून यामुळे रब्बी हंगामाला दिलासा मिळणार आहे. जानेवारीत टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार आटपाडी तालुक्यात आवर्तन सुरू करण्यात आले आहे.रब्बी हंगामातील पिकांना दोन ते तीन महिने पाण्याची आवश्यकता भासणार आहे. टेंभू योजनेचा मुख्य कालवा तालुक्यातून गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे.
हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांसह भाजीपाला, ऊस व फळबाग आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाझर व साठवण तलाव भरून घेण्यात येणार आहेत. तालुक्यात मुख्य कालव्यास अठरा स्थानिक ओढापात्राच्या ठिकाणी पाणी सोडण्यासाठी गेट बसविण्यात आले आहे, रब्बी हंगामातील पिकांसाठी येथून पुढे शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता भासत आहे. शिवाय ऊस व फळबागांनाही आवश्यकता आहे.