अलीकडच्या काळात गुन्हेगारी प्रकारात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र प्रत्येकाला पहायला मिळतच आहे. खून, मारामारी, चोरी याप्रमाणे सध्या राजेरोसपणे अवैद्य धंदे सुरु आहेत. याला तरुणाई बळी पडत आहे. सध्या इचलकरंजी शहरात याला ऊत आलेला आहे. इचलकरंजीत वाढती गुन्हेगारी चिंताजनक आहे. येथील पोलीस प्रशासन गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना चाप लावण्यात अपयशी ठरल्याने याचे थेट पडसाद रविवारच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत उमटले. आमदार डॉ. राहूल आवाडे या प्रश्नावरुन आक्रमक भूमिका मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.
इचलकरंजीचा क्राईम रेट दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. काही लोकांचे गुन्हेगारीला पाठबळ मिळत आहे. पोलीस प्रशासनही हा प्रश्न गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे गुन्हेगारांची राजधानी म्हणून इचलकरंजीची ओळख तयार होवू पहात आहे. गुंडाच्या दहशतीमुळे लोक अस्वस्थ आहेत. एक बाजुला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमितभाई शहा देशातील जनतेला भयमुक्त वातावरण राहता यावं यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र यास यंत्रणेचे सहकार्य मिळत नसल्याचे चित्र इचलकरंजीतील वातावरणावरून दिसत आहे.
इचलकरंजी गुन्हेगारीचे केंद्र तयार होत आहे. याकडे डॉ. राहूल आवाडे यांनी लक्ष वेधले. येथील गांजा तस्करीचा मुद्दाही सभागृहात उपस्थित झाला. राजरोसपणे मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री सुरु आहे. यामुळे अनेक तरुणांचे जीवन बरबाद होत आहे. हद्दपार गुंड शहरात वावरत आहेत. त्यामुळे काहीही केलं तर पोलीस आपलं वाकड करु शकत नाहीत. एकंदरीतच पोलिसांचा धाक कमी झाला आहे. असे या वातावरणारुन दिसत आहे. हे असेच सुरु राहिले तर सर्वसमान्य जनतेला मुक्तपणे शहरात वावरणे मुश्किल होईल अशी भीती यावेळी त्यांनी सभागृहात व्यक्त केली.