विट्यासह खानापूर तालुक्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त

आजपासून म्हणजेच 11 फेब्रुवारीला बारावीची परीक्षा सुरु झालेल्या आहेत. तर इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारीपासून सुरू होते. जिल्ह्यात परीक्षांचं संचालन योग्य प्रकारे व्हावं व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्ह्यात कॉफी मुक्त अभियान राबवण्यात येत असून मोहिम यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रांच्या पन्नास मीटर परिसरातील कॉम्प्युटर सेंटर ,झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन तास आधीपासून ते परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात यावे, परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध असून चित्रीकरणाची साठवणूक होत असल्याची खात्री करावी, कॉफी मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांनी परीक्षा केंद्रास भेट देण्यासाठी सुचित करण्यात आल आहे.

परीक्षा कॉपीमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. परीक्षेत होऊ नये गैरप्रकार यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. विट्यासह खानापूर तालुक्यात परीक्षा केंद्रांवर पोलिसांची फौज पाठवण्यात आली असल्याची माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली.