आता ‘लाडक्या बहि‍णीं’साठी लढणार; आमदार जयंत पाटील

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र सर्वानीच पहिले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश प्राप्त झाले. विधानसभा निवडणुकीत राज्यात सीएम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे राज्यात भाजप महायुती सरकारमध्ये आले. परंतु या योजनेमुळे सरकारवर आर्थिक एवढा आला की, ही योजना चालू राहणार की बंद पडणार, यावरून चर्चा सुरू आहे.

अर्जांची पडताळणी सुरू आतापर्यंत पाच लाख लाभार्थांचा लाभ बंद केल्याचे सांगितले जात आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून, महायुती सरकारवर टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या योजनेच्या लाभ बंद करण्यावरून इशारा दिला आहे.जयंत पाटील यांनी महायुती सरकारला इशारा देताना, सीएम लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार, यासाठी येथून पुढे आपला लढा सुरू राहील.

लाडकी बहि‍णींसाठी पैसे बंद होणार नाही, यासाठी आम्ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून तालुका-तालुका पातळीवर लढाई उभारणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.जयंत पाटील म्हणाले, आता आम्ही लाडक्या बहिणीची बाजू घेऊन काम करणार आहोत. लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत, यासाठी आमचा लढा राहणार आहे. लाडक्या बहिणींनो आम्ही तुमच्या मागे आहोत.

लाडक्या बहिणींनी तुम्हाला मते दिली आहेत, त्यांना तुम्ही शब्द दिला आहे, त्यामुळे एकदा दिले तर दिले, त्यांनी मतं दिली आहेत, त्यामुळे बघून द्यायचे होते, आम्ही घाई करा म्हणत होतो का?, अशा खोचक शब्दात जयंत पाटील यांनी महायुती सरकारला सुनावले आहे.