व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात बंदी घालण्याची बजरंग दलाच्यावतीने मागणीचे निवेदन

सध्या तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन डे चे वारे खूपच पहायला मिळते. पण हे साजरे करीत असताना अनेक विचित्र प्रकार देखील घडीत असतात. पाश्चात्त्य देशांशी असलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करून आजची तरुण पिढी भरकटत आहे. अशा प्रकारचे ‘डे’ हे युवा पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र असून यामागे मोठ्या आस्थापनांचे छुपे अर्थकारणही लपलेले आहे. यामुळे आर्थिक हानीसह या देशातील भारतीय संस्कृतीची अपरिमित हानी अशा चुकीच्या ‘डे’मुळे होत आहे. अश्या बाबींवर बंदी घालावी, अशी मागणी बजरंग दलाच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे – पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. 

व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना चुकीच्या प्रथा वा चुकीच्या घटना घडत असतात. हा दिवस साजरा करण्यासाठी तरुणाई प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल, कॅफे, बागा चित्रपटगृहे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जमा होतात यातून अनेकदा वाईट प्रसंग घडले आहेत. त्यामुळे या चुकीच्या प्रथेस आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सौ. रेवती हनमसागर, सौ. अरुणा माने, सौ. अर्चना रानडे, सौ गायत्री कुंभार, सुजित कांबळे, श्री. विशाल माळी, अमोल शिरगुप्पे, ऋषिकेश पवार, अमित पाटील आदी उपस्थित होते.