माणगाववाडी महामार्गाचे पुनर्रेखांकनाचे काम पोलीस बंदोबस्तात सुरु, शेतकऱ्यांतून प्रचंड नाराजी

सध्या अनेक भागातील रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे. तसेच अलीकडे रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गाबाबत अनेकांचा विरोध होत आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्ग क्रमांक १६६ कोल्हापूर – सांगली मार्गाला चोकाक येथून जोडण्यात येणार असून अंकली पर्यंतच्या साडे तेहत्तीस किलो मिटरच्या टप्यात हातकणंगले, शिरोळ व मिरज तालुक्यातील दहा गावातील जमिनी अधिग्रहण केल्या जाणार आहेत. यासाठी केंद्रशासनाने २५ जानेवारी २०२५ ला राजपत्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये हरकती देण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हरकती देण्यापुर्वीच संबंधीतांना जमिनी मोजणीच्या नोटीशी देण्यात आल्या आहेत. यामध्ये १७ फेब्रुवारीला मोजणी होणार असल्याचे म्हटले आहे.

हरकतीवर सुनावणी होण्यापुर्वीच शनिवारी हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी गावच्या हद्दीत पुनर्रेखांकनाचे काम प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात चालु केले आहे. याला राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचा तीव्र विरोध मुदत देण्यात कृती समितीचे विक्रम पाटील, प्रकाश पाटील अजित धनवरे, संजय सूर्यवंशी, विजय पाटोळे, संतोष कांबळे, आनंदा पाटील यासह अतिग्रे व माणगाववाडी येथील शेतकऱ्यांनी विरोध केला. यानंतर शस्त्रधारी पोलीसांचा मोठा फौज फाटा याठिकाणी बोलवण्यात आला.

रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गा अंतर्गत येत असलेल्या चोकाक ते अंकली या साडेतेहतीस किलो मिटरच्या या टप्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी गावच्या हद्दीतील शेत जमिनीचे अधिग्रहन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी पुनर्रेखांकन करण्याचे काम पोलीस बंदोबस्तात चालु केले . याला शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या मोठ्या प्रमाणात विरोध केला. मात्र, त्यांना न जुमानता शस्त्रधारी पोलीसांची जादा कुमक मागवून रेखांकनाचे काम चालूच ठेवले. यामुळे शेतकऱ्यांतून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.