अनेक भागातील रस्तेदुरुस्ती, वाहतूक, पाणी टंचाई अशा अनेक समस्यांवर सध्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था पहायला मिळत आहे. पेठ सांगली रस्त्याचे आष्टा परिसरात काम अंतिम टप्प्यात आहे. एका बाजूचा रस्ता पूर्ण झाला असून या रस्त्यावरूनच दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. रस्ता झाल्याने वाहनांचा वेगावर ताबा नाही. त्यामुळे अपघात वाढ झालेली आहे. पेठ सांगली रस्त्यावर आष्टा पोलीस ठाण्यासमोर रस्ता ओलांडून जाणाऱ्या शाळेच्या मुलांना होणारा त्रास आणि त्यांच्या सुरक्षेबाबत महात्मा गांधी विद्यालय १९९८ दहावी बॅच सेवा भावी संस्था, आष्टा यांच्यावतीने आ.जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
तसेच सदर ठिकाणी असणाऱ्या सर्व शाळांमधील मुले व मुली रस्ता ओलांडताना सुरक्षितपणे ये-जा करू शकतील यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती करून शाळकरी मुलांसाठी व रहिवाशांसाठी सुरक्षित रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पालक आणि संस्थेचे रघुनाथ शेळके, अशोक मदने, तुकाराम हलगेकर, संदीप खोत, सयाजी बसुगडे, नितीन घोडके, स्वप्निल रावळ, अजित भोसले, धनंजय गुडमे, महेश पवार, नितीन महाजन, कुबेर पाटील, देवचंद्र आवटी आणि अमित कुलकर्णी उपस्थित होते.